Share

गेल्या 7 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस…; मलिकांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. नवाब मलिकांनी सकाळी ट्विट करत फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.

गेली 7 वर्ष या देशात केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग होत राहिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव निश्चित झाल्यानंतर सपाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला लागली आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजी गेल्या 7 वर्षांपासून तपास यंत्रणांचा वापर करत होते. निवडणुकांच्या आधी पवार साहेबांना नोटीस काढण्यासाठी त्यांनी कटकारस्थान केले होते. आता आम्ही त्यांना उघडे करत असताना माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, या पद्धतीने ते पाठपुरावा करत आहेत, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात तपास यंत्रणांना आदेश देण्यात बरेच इच्छुक दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला या तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावं. कारण त्यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा बराच अनुभव आहे. आणि किरीट सोमय्यांना या यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करावं, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी ट्वीटमधून देवेंद्र फडणवीसांना लगावला होता.

दरम्यान, राजकीय द्वेष ठेवून लोकांवर कारवाई केली जात आहे हे आता उघड होतंय. माझं म्हणणं आहे तुम्ही मागून करू नका, जबाबदारी स्वीकारा आणि कारवाई करा. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही थांबणार नाहीत, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!