मुंबई: दिवाळीच्या अगोदर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ आणि १० रुपयांनी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता भाजपनेही राज्य सरकारने इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी लावून धरली आहे.
इंधनाचे दर कमी करण्याबाबत राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नंतर आता इंधनाचे दर कमी करण्याबाबतच्या मागणीसाठी काँग्रेसनेही जोर लावून धरला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनदरात झपाट्याने वाढ होत असून, देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला होता. यावरून नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली होती. त्यानंतर आता केंद्र सरकार पाठोपाठ राज्यसरकारने देखील इंधन दर कमी करावे हि मागणी सर्वत्र केली जात आहे.
माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी इंधन दर कपात मागणी करण्याविषयी सांगितले की, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्यानुसारच राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राप्रमाणे राज्यात 5 व 10 रुपये कपात व्हायलाच हवी पण..; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- केंद्राने पेट्रोल-डिझेल शुल्क कपात केले, आता राज्य सरकारनेही जबाबदारी पार पाडावी – चित्रा वाघ
- ‘राज्य सरकारनेही इंधनावरील कर थोडे कमी करून हातभार लावायला काय हरकत आहे?’
- दिवळीच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
- ‘दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले’
- नव्या बीड बायपास रोडचे उद्घाटन होणार नितीन गडकरींच्या हस्ते; नोव्हेंबर अखेरीस पूर्ण होणार काम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

