🕒 1 min read
मुबंई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी संपली असून आता त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वी संजय राऊतांनी त्यांच्या आईला पत्र लिहिलं होतं. संजय राऊत यांच्या भावनिक पत्राची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसे नेत्या स्नेहल सुधीर पारकर यांनी घंट्याचं भावनीक पत्र म्हणत टीका केली आहे.
स्नेहल सुधीर पारकर यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात –
स्नेहल सुधीर पारकर यांनी ट्वट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्राचाळ येथे राहणाऱ्या लोकांची मत ऐकून घेण्यात आली असून त्यांच्या घरांची अवस्था देखील दाखवण्यात आली आहे. घंट्याच भावनिक पत्र असं म्हणत जो मीडिया आज संजय राऊत यांच्या चार ओळींना भावनिक वैगरे बोलतोय, त्या मीडियाने एकदा पत्रा चाळ रहिवाश्यांची अवस्था पाहा, असं कॅप्शन पारकर यांनी दिलं आहे. तसेच राऊतांच्या अटकेनंतर सहकुटुंब त्यांच्या घरी भेट देणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्राचाळ रहिवाश्यांना भेटायला का नाही गेले ?, असा सवाल देखील पारकरांनी केला आहे.
पाहा ट्विट –
घंट्याच #भावनिक पत्र..
जो मीडिया आज संजय राऊत यांच्या चार ओळींना भावनिक वैगरे बोलतोय, त्या मीडियाने एकदा पत्रा चाळ रहिवाश्यांची अवस्था पाहा.. राऊतांच्या अटकेनंतर सहकुटुंब त्यांच्या घरी भेट देणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रा चाळ रहिवाश्यांना भेटायला का नाही गेले ? @ShivSena pic.twitter.com/rWHoAS6TdK— Snehal Sudhir Parkar ???? (@snehalparkar) October 12, 2022
राऊतांचं आईला पत्र –
संजय राऊतांनी प्रिय आई, जय महाराष्ट्र म्हणत आपल्या पत्राची सुरुवात केली होती. तसेच यावेळी आताच माझी ईडी कोठडी संपली असून न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे, तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय, असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे. पत्राच्या सुरुवाती पासूनच संजय राऊतांच्या पत्रात भावनिक शब्द वाचायला मिळाल्याने डोळ्यात पाणी आणण्यासारखं त्यांनी पत्र लिहिलं आहे.
खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौन्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजव भेटत होतो. दौन्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली, असं देखील राऊतांनी पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Samana । मोदी जगाचे नेते! देशातील प्रश्न नेहरूंचे!; शिवसेनेचा सामानातून नरेंद्र मोदींना सवाल
- MNS | ऋतुजा लटके यांच्या विरोधात ‘या’ नेत्याने रचला डाव ; मनसे नेत्याचा गंभीर आरोप
- Gulabrao Patil | संजय राऊतांनी आईला पत्र लिहिताच गुलाबराव पाटलांची देवाला प्रार्थना, म्हणाले…
- Andheri By-Elections । निकाल ऋतुजा लटकेंच्या विरोधात गेल्यास पर्यायी उमेदवार कोण?ठाकरे गटाचा प्लॅन B तयार
- Andheri By Election | ठाकरे गटाचा प्लॅन बी! लटकें ऐवजी ‘या’ नेत्याला मिळेल उमेदवारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
