🕒 1 min read
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची ईडी कोठडी संपली असून आता त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं.त्यामध्ये त्यांनी मी झुकणार नसून सध्या सुरू असलेल्या अन्यायाला तोंड देणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
संजय राऊत लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी आपण प्रार्थना करुयात, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, मुलगा तुरुंगात असो, यात्रेत असो किंवा राजकारणात असो त्या मुलाने आपल्या आईला पत्र लिहिणे ही एक भावना आहे. यावर मी बोलणे बरोबर ठरणार नाही. पण आता त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत. याच सकृतदर्शनी आरोपांमुळे ते तुरुंगात आहेत. देवाच्या कृपेने ते लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी प्रार्थना करूयात.
तसचे, अंधेरी पोट निवडणूकसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. राजीनामा मंजूर करण्याचे काही नियम असतात. नियमाप्रमाणे राजीनामा मंजूर होईल. काहीही झालं की सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. आता एवढेच काम शिल्लक राहिलेले असल्याचं गुलाबराव पाटील यांनी याठिकाणी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut । कठीण काळात मी उद्धव ठाकरेंना सोडले तर उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?; संजय राऊतांच भावनिक पत्र
- उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ? ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेना फेटाळला
- Bhaskar Jadhav | प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Amol Mitkari । “भावी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच”; अमोल मिटकरी यांचं भाकीत
- Sanjay Raut | “प्रिय आई…”, ईडीच्या कोठडीतून न्यायालयीन कोठडीत जाणाऱ्या संजय राऊतांचं डोळ्यात पाणी आणणारं पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
