🕒 1 min read
बुलडाणा : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. जो विस्तार झाला आहे तो कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. फारसे आमदार नाराज आहे असे मला वाटत नाही. कारण आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. बच्चु कडूंना अपेक्षा होती की आपला पहिल्या रांगेत नंबर लागला पाहिजे होता. मागच्या काळात ते राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांना कॅबिनेटची अपेक्षा होती की मागणी केली होती. हे माहित नाही. पण राज्यमंत्र्यांचा विस्तार जर असेल तर तो पुढच्या महिन्यामध्ये विस्तार होणार आहेत. अशी प्रतिक्रिया शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मात्र यामध्ये एकनाथ शिंदे गटासोबत प्रथम जाणाऱ्याला स्थान मिळाले नाही व मागून गेले त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले. अशी नाराजी एकनाथ शिंदे गटांसोबत असलेल्या आमदारांनी व्यक्त केली होती. यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sunil raut | “… हे तर त्यांचे बोगस प्रेम”; सुनील राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र
- Mahavikas Aghadi | अंबादास दानवेंच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीत राडा ; नाना पटोलेंचा इशारा!
- Sunil Raut | “आरे कारशेड हा तर फडणवीसांचा इगो”- सुनील राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | ‘धनुष्यबाण’ची लढाई दीर्घकाळ चालणार! निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला दिली १५ दिवसांची मुदत
- Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंनी फक्त इगो करिता कांजूर मार्ग धरून ठेवला – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
