Share

बर्ड फ्लूचं संकट : ‘या’ राज्याने केली राज्यस्तरीय आपत्तीची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : अद्याप देशावरच कोरोना संकट टळले नाही तोच आता काही राज्यांमध्ये आणखी एका साथीने धडक दिलीआहे. हे संकट आहे ‘बर्ड फ्लू’चं. या पार्श्वभूमीवर या राज्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

‘बर्ड फ्लू’चं हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळ या राज्यांवर हे नवीन संकट ओढावलं तर सुदैवाने महाराष्ट्रात अद्यापही या साथीचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली असून बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळने बर्फ फ्लूची प्रकरणं समोर आल्यानंतर या आपत्तीला राज्यास्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.

आज केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!