नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन मोठ्या आशिया खंडातील देशात सतत राजकीय कुरघोडी चाहलू असतात. २०१७ मध्ये डोकलाम वादानंतर, २०२० च्या जून महिन्यात भारतीय आणि चीनचे लष्कर यांच्यात ”गलवान खोर” येथे लष्करी झटापट झाली. या झटापटीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिकी अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. भारत आणि चीन सरकारमध्ये मध्यंतरी अनेक चर्चा पण झाल्या. परंतु दोन देशातील वाद काही शमताना दिसत नाहीये.
आजच भारत सरकरने चीनमध्ये उत्पादित झालेल्या ५४ अॅपवर बंदी घातली आहे. भारत देशाच्या सुरक्षितेच्या कारणावरून आम्ही चीनमधील एकूण ५४ अॅपवर बंदी घालत आहोत अशी घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. याबाबतची अधिक माहिती देताना मंत्री म्हणाले कि, ” बंदी घातलेली ५४ अॅप ही भारतीय लोकांची संवेदनशील माहिती अवैधरित्या गोळा करत होते आणि त्यामुळे देशाला व देशातील नागरिकांना यामुळे धोका संभवत होता.
आज बंदी घातलेल्या ५४ अॅपमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा सेल्फी कॅमेरा, व्हिवा व्हिडिओ एडिटर आणि ड्युअल स्पेस लाईट अश्या लोकप्रिय अॅपवर बंदी घातली आहे. २०२१ मधील जून महिन्यात भारत सरकारने टिकटॉक, वी चॅट आणि हॅलो अश्या लोकप्रिय अॅपवर बंदी घातली होती. भारतीय तंत्रद्यान कायदा ६९ (अ) मधील तरतुदींनुसार आम्ही चीनमधील अॅपवर बंदी घालत आहोत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज दिली. भारत सरकारने मे २०२० पासून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त चिनी अॅपवर बंदी घातली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- एक राजा एक जयंती; शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याची विनोद पाटलांची विनंती
- बुलडाण्यात वाईन विक्री विरोधात भाजपच्या महिला आक्रमक
- काँग्रेस नेत्याची भाजप आणि नितीन गडकरींवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले…
- IPL AUCTION 2022: यंदा लखनऊच्या रूपाने सुपरजायंट्सचा स्पर्धेत पर्दापण
- चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

