कोलकत्ता : क्रिकेट प्रेमी ज्या क्षणाची गेले कित्येक कालावधी वाट पाहत होते त्याची अखेर आज झाली आहे. विराट कोहली याने जबरदस्त आणि आक्रमक फलंदाजी करत ४१ चेंडूत ५२ धावा केल्या आहेत. भारताच्या डावामध्ये आधी विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी केली तर विराट नंतर ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर या दोघांनी धुवादार फलंदाजी करत भारताचा डाव १८६ पर्यन्त नेला.
भारत आणि वेस्टइंडीज मधील दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने सुरवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत ४१ चेंडूत ५२ धावा केल्या. या त्याच्या ५२ धावांच्या तडाखेबाज डावात ७ चौकार आणि १ षटकार होता. तर भारताचा डाव संपत असताना ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत ७ चौकार आणि १ षटकारासह २८ चेंडूत ५२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यरने १ षटकार आणि ४ चौकारासह १८ चेंडूत ३४ धावा केल्या आणि वेस्टइंडीज संघाला १८७ धावांचे तगडे आवाहन दिले आहे.
वेस्टइंडीज संघाकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शेफर्ड आणि कॉट्रेल यांनी 1-1 विकेट घेतली. भारत विरुद्ध वेस्टइंडीज संघात ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार असून, तिन्ही सामने कोलकत्ता येथील ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहेत. भारताने वेस्टइंडीज विरुद्धच्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- …जेव्हा रेल्वेमंत्र्यांनी केला लोकलने प्रवास
- आपलाच मुलगा उमेदवार आहे, हेच विसरले मुलायम सिंह यादव
- “असं वाटतंय विरोधक दररोज रात्री कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करतात”, केजरीवालांचे टीकास्त्र
- बाबर आझम सोबतच्या वादाबद्दल वसीम अक्रमने केला खुलासा म्हणाला…
- ‘सासू बनून त्रास द्याल तर…’; नाना पटोलेंचा मोदींना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

