रत्नागिरी: ओबीसी समाजाच्या (OBC Reservation) प्रश्नावर काँग्रेस (Congress) आक्रमक झाली असून आज काँग्रेसने हल्लाबोल रॅली काढलीय.रत्नागिरीतून या आंदोलनाला सुरुवात झालीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, माजी खासदार हुसेन दलवाई या रॅलीत सहभागी झाले होते.
या वेळी बोलताना नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करताना, भाजपच्या भाषणातून काँग्रेसचे नाव गेले तर यांना कोणी विचारणार नाही. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल केला जातोय. मोदी सरकारने ८ वर्षाच्या कामाचा हिशोब द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या पेक्षा मोठा भूकंप कुठला असूच शकत नाही, असा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी मोदींवर केला आहे. आपला देश चीन च्या ताब्यात चाललाय. सुनेचे दिवस येतील. सासू सारखा त्रास दिला तर त्रास होणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
… तर माझ्यासारखा स्वीट दहशतवादी नसेल ;- अरविंद केजरीवाल यांचे कुमार विश्वास यांना प्रत्युत्तर
‘शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येक जन वाघ होत नाही…’; नितेश राणेंचा राऊतांना टोला
नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत ; खर तर काँग्रेसनेच देशाची माफी मागावी :- गिरीश बापट
‘चंद्रकांत पाटील सारखा मी भविष्यकार नसून भाजीवाला आहे’ – छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

