Share

IND VS SRI 1st TEST MATCH : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, ६ बाद ३५७ धावांसह भारत मजबूत स्थितीत

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसखेर ६ बाद ३५७ धावा केल्या.

भारताच्या सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु कर्णधार रोहित शर्मा लाहिरू कुमाराच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात लकमलला झेल देऊन बसला. त्याने २८ चेंडूत २९ धावा केल्या. मयंक अगरवालही ३३ धावा करून बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु संघाची १७० धावसंख्या असताना विराट ४५ धावांवर बाद झाला.

त्यानंतर हनुमा विहारीही संघाची १७५ धावसंख्या असताना बाद झाला. त्याने या सामन्यात अर्धशतक करत ५८ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने २७ धावांचे योगदान दिले. चांगल्या लयमध्ये असणारा रिषभ पंत लकमलच्या चेंडूवर ९६ धावांवर त्रिफळाचीत झाला.

तर रवींद्र जडेजा ४५  व आर अश्विन १० धावांवर नाबाद आहेत. श्रीलंकेकडून एम्बुलदेनिया याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर लकमल, फर्नांडो, लाहिरू कुमारा, आणि धनंजया डीसिल्वा यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!