Share

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ‘ते’ वक्तव्य ठरलं खरं!

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलताना एक भाकित वर्तवले होते. निकालादिवशी अगदी पुन्हा तसेच घडले. अजित पवारांनी वर्तवलेले हे भाकीत आता खरे ठरल्याचे दिसून आले आहे.

‘दक्ष राहा, साताऱ्यात समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निकाल द्यावा लागला, तर एका मताने दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे,’ असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना बजावून सांगितले होते.

जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये महाविकास आघाडी पॅनेल प्रमुख सतीश सावंत (Satish Sawant) यांना टायनंतर पराभव स्वीकारावा लागला, तर भाजपच्या (BJP) गुरुनाथ पेडणेकर व प्रकाश गवस यांना केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे.

भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे, रविंद्र चव्हाण, नितेश राणे, प्रसाद लाड, नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली तर महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवार, उदय सामंत, सतेज पाटील, विनायक राऊत, दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, पॅनेल प्रमुख सतीश सावंत तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील या तिन्ही पक्षाची यंत्रणा काम करीत होती, त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

भाजप नेते आपण सत्ता पुन्हा खेचून आणणार, असे आधीच सांगत होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सत्ता राखणारच असे सांगत होते. मात्र, यात भाजपचे म्हणणे खरे ठरले आणि महाविकास आघाडीला 8 संचालकांवरच समाधान मानावे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!