Share

दिशा सालियन ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींना दिलासा कसा मिळतो?; संजय राऊतांचा सवाल

Published On: 

मुंबई: आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी अनेक सवाल केले आहेत. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहे.

एका विशिष्ठ राजकीय पक्षाच्या लोकांनाच न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा काम करतात. हे असंच सुरू राहिले तर देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान आज किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेत मविआ नेत्यांचा घोटाळा बाहेर काढणार आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढील 25 वर्ष त्यांना सत्ता मिळणार नाही या वेफल्यातून आरोप केले जात आहेत. 58 कोटीचा घोटाळा झाला आहे. तो पैसा कुठे गेला? न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असली तरी त्या पट्टीला छिद्र पडलं आहे. त्यातून ते आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहत आहेत. तुम्ही किती हल्ले केले, फुसके बार केले तरी काही होणार नाही. सत्र न्यायालयाने तुम्हाला प्रश्न विचारले आहे. ते काय मुर्ख आहेत का? राजभवन सांगतं पैसे जमा झाले नाहीत. अजून कसला पुरावा हवा आहे? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!