Share

“मत न देणाऱ्या आमदारांची नावे कशी कळाली?” ; सोमय्यांचा राऊतांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीला मतदान न करणाऱ्या आमदारांना गद्दार म्हटलं आहे. शिवसेनेला मत न देणाऱ्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केले आहेत. दरम्यान संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

संजय राऊत यांना शिवसेनेच्या उमेदवाराला मत न दिलेल्या आमदारांची नावे कशी कळाली? असा सवाल त्यांनी राऊतांना केला आहे. तुम्ही सहा आमदारांवर गद्दारीचा आरोप कसा केला? आमदारांची नावे कशी आणि का घेतली? ते तुमच्या स्वप्नात आले होते का? असे प्रश्न सोमय्या यांनी विचारले आहेत. “शिवसेनेकडून आता निवडणुकांची माफियागिरी होत आहे, त्यांनी आमदारांची नावे कोणत्या आधारे घेतले आहेत?” असे सवाल त्यांनी आता उपस्थित केले आहेत.

“काही छोटे पक्ष आहेत जे आपले उमेदवार उभे करू शकत नाहीत ते कुणालाही मतदान करू शकतात. पण कुणी कुणाला मत दिले हे तुम्हाला कसं कळालं, किंवा निवडणूक आयोगाला तरी कसं कळालं? याचं उत्तर संजय राऊत यांना द्यावा लागणार आहे. याचा अर्थ शिवसेनेने आचारसंहितेचा आणि गोपनियतेचा भंग केला आहे.” असे आरोप यांनी केले आहेत. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची तक्रार दाखल केली पाहिजे, असे देखील सोमय्या म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!