नवी दिल्ली : भारत देशात दरवर्षी हजारो रस्ते अपघात होत असतात. हे रस्ते अपघात रोखायचे प्रयत्न भारत सरकार करत आहे. त्यातच आज केंद्र सरकारने रस्ते अपघातामध्ये मृत पावलेल्या लोकांच्या परिवारासाठी आणि रस्ते अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन अपघातात पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाई ही १२,५०० रुपये वाढवून ५०,००० रुपयांपर्यंत केली आहे. याशिवाय जी लोक रस्ते अपघातात मृत झाली आहेत ; त्यांच्या परिवारातील लोकांसाठी केंद्र सरकारने नुकसान भरपाईची रक्कम वाढवून आता २ लाख रुपये केली आहे. हा नवीन नियम १ एप्रिल २०२२पासून देशभरात लागू होणार आहे.
भारत सरकारने अजून एका नियमात बदल केला आहे. त्यात अवजड वाहने आणि दुचाकी वाहने वाहून नेणाऱ्या ट्रेलरच्या क्षमीतेत वाढ केली आहे. आता ट्रेलरमध्ये जास्तीत जास्त तीन डेक ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वाहन वाहून नेण्याच्या क्षमतेत ४० ते ५० टक्क्याने वाढ होणार आहे. १ एप्रिल २०२० पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे देशातील अपघातात मृत पावणाऱ्या लोकांच्या परिवारास मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं’ – वामराव चटप
- आणि अजित पवारांनी केले नरेंद्र मोदी यांचे कौतुक; म्हणाले…
- विराट कोहलीने सुरु केली ‘१००’ व्या कसोटी सामन्यासाठी प्रॅक्टिस
- भगतसिंग कोश्यारींविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक
- “शरणागती पत्करणार नाही आणि आमची…”; रशियाशी चर्चेपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

