नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यातील पहिला सामना शुक्रवारी (४ मार्च) मोहाली येथे खेळला जात आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कारण विराट आपल्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळत आहे.
विराट आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४५ धावांवर बाद झाला आहे. परंतु विराटने ४५ धावांवर बाद होऊनही अजून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने १०० व्या सामन्याबरोबरच आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठ हजार (८००७) धावांचा टप्पा पार केला आहे.
विराटला हा कारनामा करण्यासाठी १०० सामने व १६९ डाव लागले. या दरम्यान त्याची ५०.३६ एवढी सरासरी राहीली आहे. तर २५४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने आपला पहिला पदार्पण कसोटी सामना २० जून २०११ रोजी वेस्टइंडीजविरुद्ध सबीना पार्क येथे खेळला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

