अहमदनगर : एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यात मूक मोर्चांना सुरुवात झाली असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आजपासून (१७ जून ) महिनाभर ओबीसी संघटना आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले. राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून आघाडी सरकारने पाठपुरावा सुरू केला. मागासावर्ग आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरू केली असली तरी इतर मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष असल्याचे दिसून येत आहे.
यावरून आता भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी माविकास आघाडी सरकावर सडकून टीका केली आहे. राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे बोलताना हा घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- कोविड संदर्भातली माहिती पारदर्शकरित्या जनतेला का दिली जात नाही?
- आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक, भूजबळांच्या नेतृत्वात उतरला रस्त्यावर
- ‘त्या’ चोरट्यांकडून जप्त केलेल्या ३४ पैकी २२ दुचाकी पोलिस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना परत
- रोहित-गिलवर युवराजने केले मोठे विधान ; ‘या’ गोष्टींमुळे वाढू शकतो तणाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

