इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन येथे पोहोचले आहेत. या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने या स्पर्धेवर भाष्य केले आहे.
युवराजने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये कोणता संघ मजबूत आहे हे सांगितले. त्याच्या या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचा ताण वाढू शकतो. युवराज म्हणाला की, अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला एक फायदा आहे, कारण इंग्लंडविरुध्द त्यांनी कसोटी मालिका खेळली आहे.
युवराज म्हणाला पुढे म्हणाला, ‘टीम इंडियाने बर्याच दिवसांपासून कसोटी सामना खेळला नाही. सरावाचा अभाव आहे आणि अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाचे सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यावर युवराज म्हणाला की, रोहित एक अनुभवी फलंदाज आहे. कसोटीतही त्याच्या नावावर शतक आहे. पण हे दोघेही इंग्लंडमध्ये सलामीला खेळले नाही.
‘सत्रानंतरचे सत्र इंग्लंडमध्ये खेळावे लागेल आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्ही यशस्वी व्हाल. गिलने ऑस्ट्रेलियामध्ये चांगली कामगिरी केली होती आणि ऑस्ट्रेलियावर त्याने चांगली कामगिरी केली असेल तर इंग्लंडमध्येही तो चांगला खेळू शकतो, असा त्याचा विश्वास आहे. युवराज म्हणाला की टीम इंडियाचा मार्ग विश्वास, कामगिरी आणि उपासमार ठरवेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- ‘…तरच मला टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळू शकेल’
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
- अजब! ‘या’ विषयात बी. कॉमच्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला चक्क भोपळा


