Share

‘त्या’ चोरट्यांकडून जप्त केलेल्या ३४ पैकी २२ दुचाकी पोलिस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना परत

Published On: 

औरंगाबाद : जुन्या शहरातून दुचाकी लंपास करून फायनान्स कंपनीच्या असल्याची थाप मारून लोकांना विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या ३४ दुचाकीपैकी २२ दुचाकी बुधवारी (दि.१६) पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आल्या.

सिटीचौक पोलिसांनी २४ मे रोजी शहागंज भाजीमंडईतून दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गौसखा कालेखा पठाण (वय ३५, मूळ रा. नाणेगाव, ता. सिल्लोड, ह.मु. ब्रिजवाडी) व नवाबखा उस्मानखा पठाण (वय ४०, रा. वडीगोद्री, ता. भोकरदन, जि. जालना) यांना अटक केली होती. अटकेत असलेल्या दोघांच्या ताब्यातून सिटीचौक पोलिसांनी चोरीच्या ३४ दुचाकी जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या ३४ दुचाकीपैकी २२ दुचाकी बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या हस्ते २२ दुचाकी मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आल्या.

यावेळी उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, सिटी चौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे आदींची उपस्थिती होती. सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक के. डी महांडुळे व त्यांच्या पथकातील जमादार खैरनार, संजय नंद, संदीप तायडे, शेख, माजिद पटेल, देशराज मोरे, संतोष शंकपाळ, गायकवाड आदींच्या पथकाने चोरट्याच्या ताब्यातून ३४ दुचाकी जप्त केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!