Share

‘आम्ही भरवलेल्या शर्यतीला मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचे डोळे उघडले’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उच्च न्यायालयाने (High Court) बैलगाडी शर्यतीला (Bullock Cart Race) आज परवानगी दिली आहे. बैलगाडी मालक, संघटनांसह आमदार महेश लांडगे यांच्या गेली दहा वर्षे प्रयत्नांमुळे बैलगाडी शर्यंत पुन्हा सुरु झाली, असे मत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padlakar) यांनी आज व्यक्त केली आहे.

आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे.

राज्यात 2011 पासून शर्यतीवर बंदी होती. सन 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शर्यंती सुरु केल्या होत्या, पण प्राणीमित्र न्यायालयात गेल्यामुळे पुन्हा बंदी आली. आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) शर्यंतीसाठी आग्रही होते, असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

राज्यातील शेतक-यांसह बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयात निर्णय झाला तरच राज्यात चांगलं होत आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील सरकार काहीच करीत नाही हे आज सिद्ध झालं. आम्ही झरे गावात एक मोठी स्पर्धा आयोजित केली. सरकारने त्यावेळी स्पर्धा होऊ नये यासाठी प्रयत्न केले. परंतु स्पर्धेस मिळालेल्या प्रतिसादानंतर सरकारचे डाेळे उघडले. आज शेतक-यांच्या चळवळीला यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!