🕒 1 min read
मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही या निर्णयावरून नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा’, असे ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी काही दिवस पूर्वी मांडला होता. मला या गोष्टीचे समाधान आहे कि देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबई रूप पुढे कसं असणार आहे, ते ठरवण्याच्या दृष्टीने कष्टकऱ्यांना आणि झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ज्या योजना आणल्या आहेत त्यासाठी मी मंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो’, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून?”, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ घोषणेवर संदीप देशपांडेंचा सवाल
- माढ्यात गाईने दिला एकाच वेळी दोन वासरांना जन्म!
- यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- CSK vs KKR : कधी, कुठे, केव्हा पाहता येणार IPL 2022चा पहिला सामना? वाचा एका क्लिकवर!
- “तुमचा जो महाराष्ट्रद्रोही आत्मा आहे, तो शांत करा” , राऊतांचा फडणवीसांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
