लखनऊ : योगी आदित्यनाथ सरकारचे दुसरे पर्व सुरु झाले असून आज (२६ मार्च) पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत योगी सरकारने मोफत रेशन योजना तीन महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून मोफत अन्न योजना तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या योजनेचा लाभ जून २०२१ पर्यंत १५ कोटी नागरिकांना मिळणार आहे.
दरम्यान, बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की,‘या निर्णयाचा राज्यातील जवळपास १५ कोटी लोकांना फायदा होणार असून आमच्या मंत्रिमंडळातील हा पहिला निर्णय आहे. व याची माहिती मी स्वतः तुम्हाला देत आहे,’ असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “भारताचा राष्ट्रवाद धर्मावर नव्हे तर…”, शशी थरूर यांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022: ही दोस्ती तुटायची नाय ! फाफ धोनीच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- “…त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”, अजित पवारांनी सांगितले कारण
- “आमदारांना मोफत घरं मिळणार…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
- महिला क्रिकेटसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; महिलांच्या आयपीएलचे नियोजन होणार!


