Share

“जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाई विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२५ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच मला तुरुंगात टाका. पण कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, अशी विनंती ठाकरे यांनी भाजपला केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘मुख्यमंत्री ‘कुटुंबियांना त्रास नको’ असं म्हणत आहेत. समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांना तुमचे प्रिय नवाब मलिक त्रास देत होते तेव्हा ‘good going’ म्हणून पाठ थोपटत होतात त्यांची.जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर…’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘टाका मला तुरुंगात… कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल विधानसभेत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!