जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले आहेत, यामध्ये सुमारे 35 टक्के शेतकऱ्यांनी यावर्षी कांदा लागवड केली आहे. यामध्ये वालसावंगी वडोद तांगडा, धावडा, पिंपळगाव रेणुकाई, आधी गावचे शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेत आहेत.
यावर्षी तालुक्यात पाणी साठा मुबलक उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी मका, गहू, हरभरा या पिकांबरोबर कांदा पिक सुद्धा घेतले आहे व ते चांगल्याप्रकारे सुद्धा बहरून आले आहे. वडोद तांगडा येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष साळवे व संतोष जाधव यांनी आपल्या एक – एक एकर शेतामध्ये कांदा पिकाची तीन महिन्यापूर्वी लागवड केली होती. त्याची योग्य निगा राखून योग्य प्रकारे निगा राखली आणि याचे फळ त्यांना चांगले मिळाले सुद्धा.
कांदा हा आता काढणीला आला आहे, तो मार्केट विक्रीसाठी तयार सुद्धा झाला आहे. पण कांद्याला सध्या बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारने कांद्याची आयात निर्यात करावी जेणेकरून कांद्याला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
