मुंबई : भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० (ENG vs IND) आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडकडून १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भारतीय संघाने ही मालिका २-१ अशी जिंकली. टीम इंडियाला तिसऱ्या टी-२० क्रिकेटमध्ये विजयासाठी २१६ धावांची गरज होती, पण लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी केवळ ३१ धावांत तीन विकेट गमावल्या.
माजी कर्णधार विराट कोहलीने आक्रमक खेळ करत ११ धावा केल्या, पण डेव्हिड विलीच्या चेंडूवर जेसन रॉयने त्याला शॉर्ट कव्हरमध्ये झेलबाद केले. कोहलीच्या खराब फॉर्मवर बरीच टीका होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा बचाव केला आणि म्हणाला, ”मी आतापर्यंत पाहिलेले टी-२०, विशेषत: जेव्हा तुम्ही अशा संघासोबत लक्ष्याचा पाठलाग करता तेव्हा तुम्ही क्रीजवर येता आणि कोहली ज्या प्रकारे खेळला, ते फलंदाजाची गुणवत्ता दर्शवते.”
रोहित शर्मा पुढे म्हणाला, ”आम्ही तीन विकेट लवकर गमावल्या आणि आम्हाला सामन्यात टिकून राहायचे होते. आम्हाला शक्य तितकी भागीदारी आणि फलंदाजी करायची होती. विराट कोहलीने आज सर्व काही ठीक केले. शेवट चांगला झाला नाही याबद्दल थोडी निराशा आहे. तुम्हाला असे परफॉर्मन्स रोज बघायला मिळत नाहीत. त्यामुळे एक संघ म्हणून आम्ही ते दोन्ही हातांनी घेऊ आणि मला खात्री आहे की विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये येईल. जेव्हा तो अशा परिस्थितीत खेळायला जातो तेव्हा आमची प्रतिक्रिया पाहून त्याला खूप आनंद होईल.”
महत्त्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

