मुंबई: नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकींनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी मोडून काढण्यात शरद पवारांना यश आलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी केलेली बंडखोरी मोडून काढण्यात उद्धव ठाकरेंना अपयश आले आहे. यावरच शरद पवारांना (Sharad Pawar) औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता.
शरद पवारांनी सध्याची स्थिती आणि तेव्हाची स्थिती वेगळी होती असे म्हणत आमच्यात काही झालच नव्हतं. जे गेले त्या लोकांवर आमचं नियंत्रण नव्हतं. आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तर देता आलं असतं. असे शरद पवारांनी म्हटले आहे.
तसेच आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नव्हते. त्यावेळी जे घडलं ते सारं अचनाक घडलं होतं. आणि शिवसेनेनी पुकारलेला बंड हा वैचारिक मतभेदामधून असल्याचेही पवारांनी म्हटले. दरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला असून यावर आज कोर्टात सुनावणी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या आमदार निलंबनाच्या अधिकारांवर बंदी घातली
- Breaking News : १६ आमदारांच्या याचिकेसाठी कोर्ट खंडपीठ नेमणार
- Ramdas Athawale | “मनसेला मंत्री पद देण्याबाबत विचार होत असेल तर…” ; रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
- Eknath Shinde vs Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील सत्तांतर वादात सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ दोन निर्णयांकडे असणार लक्ष
- Sharad Pawar : “मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशी…”, शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

