Share

जागावाटपावरून वंचित आघाडीत मिठाचा खडा ? एमआयएम आणि भारिपमध्ये मतभेद

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने समविचारी पक्षाला सोबत घेत युती आणि आघाडी करत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. वंचित आघाडीनेही येत्या विधानसभेसाठी एमआयएम सोबत जागावाटपा संदर्भात चर्चा करायला सुरवात केली आहे. मात्र या चर्चेत प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन आघाडीचे आणि एमआयएमचे दुमत होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जागावाटपावरून वंचित आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी 98 जागांची मागणी केली आहे तर वंचितने एमआयएमला फक्त 8 जागांची ऑफर दिली आहे. हे एमआयएमला मान्य नसल्याने खासदार असदुद्दीनऔवेसी आणि प्रकश आंबेडकर यांच्यात चर्चा होणार आहे. याबाबत औरंगाबादचे एमआयएमचे खा. एम्तियाज जलील यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेतून जास्तीत जास्त 75 जागांपर्यंत एमआयएम आघाडी मान्य करेल मात्र प्रकाश आंबेडकरांनी खासदार असदुद्दीन औवेसी यांच्याशी चर्चा करण्याचं ठरवलं आहे. राज्यात एमआयएमची ताकद आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर आमचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे औवेसी आणि प्रकाश आंबेडकर हे चर्चा करून योग्य निर्णय घेणार आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने भाजप युतीला आणि कॉंग्रेस आघाडीला जोरदार टक्कर दिली होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात औरंगाबाद मतदारसंघात एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय देखील झाला. तसेच अनेक मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!