मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी शपथ पत्रात मोठी भाषणं केली, परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहिला नाही ना? मग एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का पूर्ण करत नाहीत, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल परब यांना केला आहे.
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, वैष्णव देवीला जे घडलं ते दुर्दैवी, प्रशासनाने सोय करायला हवी होती. केंद्राने एसओपी करणं आवश्यक होतं. संजय राऊत काय बोलतात त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. एसटी कामगारांच्या मागण्या शपथ पत्रात, मोठी भाषणं केली, अनिल परब स्व:ता म्हणाले होते. मात्र कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत. शपथनामा हा क्रुझ पार्टीत पत्ती मारून तर लिहीला नाही? असा सवाल त्यांनी केला. शपथनाम्यात जे लिहिलंय त्यावर तुम्ही कृती करायला पाहिजे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले. भाजपची सत्ता येणार का हा प्रश्न नाही, शुन्यातून सत्तेत पोहोचण्यासाठी काम करणार, असल्याचं सुधीर मुनगंटीवर म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोक गांज्या मारुन बोलतात, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली होती. याबाबत मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता, मी गंभीरपणे घेत नाही, डॉक्टरापेक्षा कम्पाऊंडर बरा. असा टोला संजय राऊत यांना लगावला. एसटीच्या कर्मचारी संपाबाबत संमजस्यपणे विचार केला पाहिजे. एसटी कर्मचऱ्यांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही शपथनाम्यात सांगितल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देऊ असे तुम्ही म्हणाले होते. तसेच अजित पवारांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मला अजित दादांचं कौतुक वाटतं, ते कधीच मास्क काढत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

