पुणे : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असून यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. या दिवशी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येते. यंदाही हा दिवस प्रशासनाच्या योग्य त्या खबरदारीसह पार पडणार आहे. तसेच कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी अभिवादन केले. तद्पश्चात पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी कोरोनाच्या निर्बंधांसंबंधी बोलत असतांना पवार म्हणाले की,’कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार आहे.’ तसेच आत्तापर्यंत १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढे कोरोनामुळे लांडेवाडीतील बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थगिती संदर्भात बोलतांना अजित पवार म्हणाले की,’कोरोना परिस्थितीचा विचार करून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली जावी.’ तसेच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असेही पवार यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

