Share

‘देर आए दुरुस्त आए’, म्हणत फडणवीसांचा ठाकरे सरकारला खोचक टोला

Published On: 

मुंबई : ठाकरे सरकारने आज मुंबईकरांच्या फायद्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करण्याचा दिलासादायक निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या आदेशानुसार राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः दिली आहे. महाविकास आघाडीच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

“2017 चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर 2022 हे निवडणुकीचे वर्ष उजाडले! देर आए दुरुस्त आए…!” असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित करत आपली भूमिका मांडली होती. याबाबतचा व्हिडिओ फडणवीसांनी शेअर केला होता. त्याबाबतच आज ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!