Share

Maharashtra Crisis : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाखाली FIR नोंदवण्याची मागणी

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध देशद्रोह आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्याची विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोणतेही वक्तव्य करण्यापासून हायकोर्टाने या तिन्ही नेत्यांना रोखावे, अशी विनंती करणारी याचिका पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या हिमंता पाटील यांनी दाखल केली आहे. शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले असून ते असंतुष्ट आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले कि, “आज माननीय राज्यपालांना ईमेल आणि थेट पत्र देऊन भाजपने मुख्यमंत्री आणि सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले. राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेचे 39 आमदार पक्षाबाहेर असून ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत नसल्याचे सातत्याने सांगत आहेत. म्हणूनच आम्ही माननीय राज्यपालांना तत्काळ मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यास सांगितले.”

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!