नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी निर्देश दिले. शनिवारी सर्व राज्यांच्या पोलिसांना कोर्टाने निर्देश दिले की, जोपर्यंत गरज नसेल तोपर्यंत आरोपीला अटक करू नये. कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी हे निर्देश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, आमच्या आधीच्या आदेशानुसार ज्या कैद्यांना पॅरोल देण्यात आली आहे, त्यांना पुन्हा ९० दिवसांची फर्लो द्यावा. यात उशीर करू नये.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘गेल्यावर्षीच्या निर्देशाचे राज्याने पालन करावे. ज्या कैद्यांना गेल्या वर्षी सोडले होते, त्यांची पुन्हा सुटका करावी. ज्यांना पेरोल मिळाले होते, त्यांना ९० दिवसांसाठी सोडावे. तसेच महत्त्वाच्या प्रकरणासंबंधितच अटक केली पाहिजे.’ सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नियुक्त केलेल्या समितीला सांगितले की, ‘सशर्त सुटण्यास पात्र असलेल्या नव्या कैद्यांनाही त्यांच्या सुटकेसाठीच्या विचारात घ्यावे.’
यापूर्वी देशातील सर्वात मोठे तुरूंग तिहार जेलमधील कैद्यांना पेरोलवर सोडण्याची तयारी झाली आहे. शुक्रवारी कोरोना केसेस वाढल्यामुळे तिहार जेल प्रशासनाने जवळपास ४ हजार कैद्यांना पेरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. या कैद्यांना ९० दिवसांच्या जामीनावर सोडले जाईल. तिहार जेलमध्ये १० हजार २६ कैद्यांची क्षमता आहे, परंतु सध्या १९ हजार ६७८ कैदी बंद आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३०० पेक्षा जास्त कैदी आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. शिवाय गेल्या आठवड्यात ५ कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय! रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नाही
- सुखद, सकारात्मक! देशात पहिल्यांदा एका दिवसात ३ लाख ८५ हजार रुग्ण कोरोनामुक्त
- ‘कोरोना परिस्थितीत मोदी सरकारला काम करता येईना’, राष्ट्रवादीचा टोला
- गंभीर! ‘मराठा आरक्षणाच्या अहवालातील चार हजार पाने गायब’, भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ
- गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
