Share

‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा

Published On: 

जळगाव : शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेतून कर्ज घेतात. कर्जाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. पण कर्ज देण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. येत्या दोन दिवसांत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पेरणी तोंडावर आली आहे. तरीही बँकाकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा संथगतीने होत असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. शेतकरी राजा ५२ टक्के रोजगाार जनतेला उपलब्ध करुन देतो. त्यांना कर्ज देण्यास कुणी नाटक करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कटीबध्द आहोत. आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचना व करण्यात आलेली तयारी याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात १ लाख ३३ हजार मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. बाहेरील राज्यातून काही बियाणे जिल्ह्यात येते. बनावट बियाणे खरेदी करुन शेतकऱ्यांची फसवणृूक होते. त्यासाठी कृषी विभागाची १६ भरारी पथके जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेमण्यात आली आहेत. प्रत्येक भरारी पथकाने पाच दुकानांची तपासणी करावी. राज्याच्या सीमेवर एक भरारी पथक कायम रहावे. बनावट बियाणे जिल्ह्यात येणार नाही, अशी उपाययोजना करण्यात आली आहे. या वर्षी खते व बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे देण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. बनावट बियाणे विकाल तर खबरदार, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!