🕒 1 min read
मुंबई : सुप्रीम कोर्टाने राज्यातील प्रकरणावर तात्काळ सुनावणी करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची कारवाई पुढे ढकलावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या विनंतीवरून न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सध्या एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यापैकी एक म्हणजे शिंदे गटातील १९ आमदारांच्या अपात्रतेची. यावर आज झालेल्या सुनावणीवर अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
