Share

‘महाराजांचा अवमान तर सोडाच, अनादरही खपवून घेतला जाणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बंगळुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही समाज कंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतला. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता यातच काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा (revolutionary Sangoli Rayanna) यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकतेच वाराणसीत काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशाची संस्कृती चिरडण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे निर्माण झाले असे कौतुकोद्गार काढले होते. या कार्यक्रमास काही दिवस झाले नाही तोच, भाजपशासित कर्नाटकात याच शिवरायांची विटंबना होते आणि कुणावर कारवाई न करता उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!