Share

“हातात दांडा घ्या आणि सरळ…”, पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश  

Published On: 

औरंगाबाद : ज्या मैदानावर हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी सभा गाजवली होती, त्याच मैदानावर आज मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे औरंगाबादला सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी पाणी प्रश्नावर मोठे वक्तव्य केले.

मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच जे कोणी माफिया येतील त्यांना हातात दंडा घेऊन दूर करा आणि योजना पूर्ण करा. मधील काळात किंमती वाढल्या, परंतु या योजनेच्या खर्चाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. एक पैसा कमी पडू देणार नाही. असे म्हणत त्यांनी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना आदेश दिले आहेत.

यावेळी त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!