टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी ‘हा विषय माझ्या ताकदीच्या पलिकडे असल्याचं सांगत बोलण्यास नकार दिला. नारायण राणे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह निर्णय घेण्यास समर्थ आहेत असं विधान केले. त्यामुळे नारायण राणेच्या प्रवेशावर चंद्रकांत पाटील नाराज तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढे बोलताना पाटील यांनी ‘भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल असाच ते निर्णय घेतील. मात्र शिवसेनेची नारायण राणे यांच्याबाबत काही नाराजी असेल तर या संदर्भात मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांच्या ना हरकती नंतरच राणेंच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, येत्या १ सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी याआधीच स्पष्ट केलेआहे. तसेच त्यांच्यासह त्यांचे दोनही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षच भाजपमध्ये विलीन होणार आहे.
- धनंजय मुंडेंना पंकजाताई, प्रितमताई नाही, तर सुरेश धस पुरेसे आहेत : मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेला ‘हा’ कॉंग्रेसचा मातब्बर नेता भाजपच्या वाटेवर
- मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
- मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
