Share

Chandrakant Khaire : “मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील”; चंद्रकांत खैरेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

Chandrakant Khaire । मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस अनेक मोठे गौप्यस्फोट होतायत. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला कोणाला स्थान मिळणार याबाबत मोठ्या चर्चा सुरु आहेत. 12 दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात नाही. मंत्रिमंडळ अजूनही स्थापन झालं नाही. यावरून आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केलाय.

चंद्रकांत खैरे म्हणाले कि, सध्या सुरु असलेलं शक्ति प्रदर्शन हे खोटं आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये वाद होणार आहेत. येणाऱ्या काळात त्यांना कळेल की इथे दिल्लीचा कंट्रोल आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अनेक आमदार मातोश्रीवर येऊन डोकं टेकवतील, असा दावाच त्यांनी केलाय. तसंच खैरे यांनी भाजपवरही यावेळी जोरदार निशाणा साधलाय.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचीही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून मनसेला ही ऑफर दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्रात छापून आली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांनी ही ऑफर धुडकावल्याचेही वृत्त आहे. मात्र, राज ठाकरे यांनी याबाबत माहिती देताना असं काही नाही, असे सांगून यावर पडदा टाकला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!