Share

Arvind Kejriwal | भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी! केजरीवालांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : दिल्ली विधानसभेत गदारोळ होत असताना, अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ५८ मते पडली, तर एकही आमदार विरोधात उभा राहिला नाही. उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजप आमदार विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात “बनावट खटला” दाखल करण्यात आला होता आणि सीबीआयला त्यांच्या तपासात काहीही आढळले नाही.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे. सुमारे 10 राज्यातील आमदार 20 कोटींना विकत घेतले, दिल्लीतही 40 आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न झाला. 20 कोटी कमी झाले नसते पण इथे कोणी विकले गेले नाही. ते म्हणाले की, ‘आप’चा एक आमदार तुरुंगात, एक कॅनडात आणि तिसरा ऑस्ट्रेलियात आहे. यानंतरही आमच्या बाजूने 58 मते पडली आहेत.

तीन आमदार उपस्थित राहिले नाहीत-

विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पक्षाकडे एकूण 62 आमदार आहेत. दोन देशाबाहेर आहेत, एक तुरुंगात आहे. चौथा सदस्य हा सभागृहाचा अध्यक्ष असून आमच्या बाजूने एकूण 58 मते पडली आहेत. प्रत्यक्षात पक्षाचे तीन आमदार विधानसभेला उपस्थित राहू शकले नाहीत.

संगम विहार प्रकरणाबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, मुलीला सर्वोत्तम उपचार दिले जातील आणि दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. ते म्हणाले की, एका अहवालात दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित असल्याचे म्हटले आहे, एलजी आणि केंद्र सरकारने यावर कारवाई करावी.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!