Share

Dasara Melawa 2022 | बाळासाहेबांच्या वारशाची लढाई! दसरा मेळाव्यावरून उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे का भिडले?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय फेरबदल झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन गटात खडाजंगी सुरू आहे. एकीकडे उध्दव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठी दुफळी तयार झाली आहे. आता दसरा मेळाव्यात दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 1966 पासून शिवसेना दरवर्षी येथे दसरा मेळावा घेत आहे. मात्र यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दोन्ही गट मूळ शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत. तर शिवसैनिक आजही आपल्या पाठिशी आहेत, असा संदेश उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यातून द्यायचा आहे, मात्र त्याच्या परवानगीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी बीएमसीकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने ५ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर सभा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे. मात्र यावर कोणताही निर्णय झाला नाही.

शिवाजी पार्कवर मेळावा होणारच-

तर मेळाव्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. काहीही झाले तरी शिवाजी पार्कवर मेळावा होणारच, असे ते म्हणाले. बीएमसीमध्ये शिवसेनेचा टर्म संपला आहे. आता पुन्हा निवडणुका होणार आहेत. अनेक महिन्यांपासून राज्य सरकारने नियुक्त केलेला प्रशासक महापालिकेचा कारभार पाहत आहे. ही महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून घेण्यासाठी अमित शहा यांच्यापासून सर्वच राजकीय दिग्गज कामाला लागले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गट आणि भाजप शिवसेनेच्या दसरा मेळावा हायजॅक करु शकतात.

दसरा मेळावा का महत्वाचा-

उद्धव ठाकरेंच्या परवानगी अर्जावर बीएमसीने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिंदे गट स्वबळावर दसरा मेळावा घेण्याचा विचार करत असल्याचेही वृत्त आहे. या मेळाव्याचे महत्त्व दोन्ही गटांना माहीत आहे. ही वर्षातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. 30 ऑक्टोबर 1966 रोजी प्रथमच शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी वर्षभराचा अजेंडा ठरवणे हा त्याचा उद्देश होता. या मेळाव्याला राज्यातील प्रत्येक भागातून कार्यकर्ते पोहोचायचे. वर्षभराच्या कार्यकाळाबात बाळासाहेब येथे भाषणे देत असत.

1991 मध्ये दसरा मेळाव्यातच बाळासाहेबांनी पाकिस्तानसोबतच्या सामन्याला विरोध केला होता. यानंतरच शिवसेना कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदली जिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना होणार होता. तसेच 2010 च्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपला मुलगा आदित्य ठाकरे यांना या मेळाव्यात लाँच केले होते.

…तेव्हा दसरा मेळावा होऊ शकला नाही-

वडिलांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतली. 2013 पासून ते शिवाजीपार्क येथे या मेळाव्याचे आयोजन करत आहेत. 2015 मध्ये त्यांनी हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधला होता, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर निर्माण झाले होते. 1966 नंतर असे काही प्रसंग आले आहेत जेव्हा दसरा मेळावा आयोजीत करण्यात आला नाही. 2006 मध्ये अतिवृष्टी आणि 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे दसरा मेळावा झाला नाही. त्याच वेळी, 2020 मध्ये कोविड महामारीमुळे, हा मेळावा आभासी मार्गाने झाला. तर 2021 मध्ये दसरा मेळावा सन्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!