Share

भाजप नेत्या उमा भारती यांच्याकडून शिवसेनेला टोला; ट्वीट करत म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : मुंबई येथील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्यावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. यानंतर आता भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर होताच, भाजप नेत्या उमा भारती यांनी शिवसेनेला टोला लगावणारं ट्वीट केले आहे. हे ट्वीट सध्या चर्चेत असताना पाहायला मिळत आहे.

उमा भारती यांनी राणा दाम्पत्याच्या बाजूने ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, “नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयातून सुटका झाल्याने समाधान लाभले आहे. त्यांच्या कर्तुत्वावर मला गर्व आहे. मी श्री उद्धव ठाकरे त्यांच्या सरकारकडून अशी अपेक्षा केली नव्हती.” असे म्हणत ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

“शिवसेनेचा जन्म हा बाळासाहेब ठाकरे यांच्या तपातून झाला आहे. सर्व शिवसैनिकांनी विचार करायला हवा की ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची संस्कार आणि परंपरा आहे का तर. हनुमान चालिसा पठण करण्याचा स्थानावरून खासदार नवनीत राणा चुकीच्या असू शकतात. पण हनुमान चालीसा पठण कधीही आणि कुठेही चुकीचं असू शकत नाही”. विविध अटी शर्ती घालून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे आतापर्यंत त्यांच्या समर्थनार्थ समोर होते. अशातच आज भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी ट्विट करून राणा दाम्पत्याला समर्थ दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!