Share

ज्यांचे बंगालमध्ये नामोनिशाण सुद्धा नाही, त्यांनाच पिपाण्या वाजवण्याची घाई; शेलारांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोना संकट वाढत असतानाच केरळ, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यानंतर, आज मतमोजणी पार पडत असून निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात उतरले होते.

दरम्यान, आता निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी कडवी लढत दिली आहे. यामुळे भाजपने मागील निवडणुकांपेक्षा मोठी मुसंडी मारली असली तरी दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. यामुळे अमित शाह यांनी केलेला सत्तास्थापनेचा दावा अपुरा राहिल्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.

आता भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी भाजपवर टीका करणाऱ्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपाने आसाम, पुदुच्चेरी जिंकले… पश्चिम बंगाल दिदींनी राखले आमच्या जागा, मतदानाची टक्केवारी वाढली काँग्रेसची देशभरात दाणादाण उडाली.! ज्यांचे तिकडे नामोनिशाण सुद्धा नाही त्यांची इथे पिपाण्या वाजवायची घाई! महाराष्ट्रात यांनी विश्वास गमावला पंढरपूरात विठोबा म्हणूनच आम्हाला पावला!’ असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.

पंढरपुरात राष्ट्रवादीचा जिव्हारी लागणारा पराभव तर भाजपचा विजय !

अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!