Share

‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगतायत, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे काल अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पूर्णाकृती पुतळ्याचे काल उदघाटन पार पडले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर मंत्री तसेच शिवसेनेचे नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते.

या पुतळ्याच्या उदघाटनानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना या पुतळ्या संदर्भात प्रश्न केला असता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘बाळासाहेबांचा पुतळा पाहिल्यानंतर वाटतं की ते उद्धव यांना सांगत आहेत की, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला’ असा टोला आठवलेंनी लगावला आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत परत यायला हवं’ असा सल्ला देखील त्यांनी दिला. पुढे ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचं सरकारचं भविष्य आपल्याला दिसत नाही. एकतर काँग्रेस पक्ष हात काढून घेईल किंवा दोन्ही पक्षाला कंटाळून उद्धव ठाकरे आमच्यासोबत येतील.’

दरम्यान, या उदघाटन समारंभावेळी अनेक सर्वपक्षीय नेते, मंत्री उपस्थित असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीनंतर राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. . तर अजित पवार पुण्यात असल्याने ते उपस्थित राहू न शकल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!