मुंबई : दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पावसाळी अधिवेशन खूप रंगलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. काल अधिवेशनाच्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली होती. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यामध्ये अनेक मागण्या केल्या गेल्या. त्यामध्ये शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आदिवासी समाजासंबंधी एक मागणी केली आहे.
आदिवासी समाजाला न्याय द्या, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. देशाला ७५ वर्ष स्वातंत्र्य पूर्ण झाले. आदिवासी समजतील महिला राष्ट्रपती झाल्या. ज्या परिस्थिती आदिवासी समाज राहतो. लाज वाटली पाहिजे जे काम झालं पाहिजे ते झालं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हे बोलत असताना मी कुणालाही दोष देत नाही. तसेच मी कुणाला बोट दाखवत नाही आपण न्याय दिला पाहिजे, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांची ही मागणी शिंदे सरकार पूर्ण करणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सकाळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि भाजपचे पक्षनेते आंदोलन करत होते. त्यावेळी युवराजांची दिशा चुकली, असं म्हणत सत्ताधारी पक्षनेत्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Thombre “फडणवीस साहेब पुणे महानगरपालिका, पिंपरी…” रुपाली ठोंबरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
- Jayant Patil। पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं – जयंत पाटील
- Devendra Fadanvis | बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – देवेंद्र फडणवीस
- AAP | आप पक्षाचे आमदार नाॅट रिचेबल, महाराष्ट्र नंतर आता दिल्लीमध्ये ऑपरेशन लोटस
- Aditya Thackeray | पोस्टरबाजीवरून आदित्य ठाकरे यांचे सत्ताधारी नेत्यांना प्रत्त्युत्तर म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

