🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आज (१० एप्रिल) रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटून उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत’, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, दादरमध्ये मनसेकडून शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली, त्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तद्पश्चात यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. ते म्हणाले की,‘ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपले हिंदुत्व सोडले. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात.’
महत्त्वाच्या बातम्या –
- “…त्यांचा हेतू स्वछ नव्हता”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
- उद्यानाला नगरसेवकाच्या वडिलांचं नाव देण्यास नागरिकांचा विरोध
- IPL 2022 KKR vs DC : दिल्लीच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये लढत; नाणेफेकीचा कौल कोलकाताच्या बाजूने!
- IPL 2022 : RCBचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन; मुंबईविरुद्धची मॅच खेळताना समजली वाईट बातमी!
- “केंद्र सरकारच्या राजकारणामुळे देशावर वीजेचे संकट” – नाना पटोलेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
