🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : वंचित आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी वंचित आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत वंचित आघाडीच्या जागावाटपाबाबत तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.
एमआयएमए वंचित आघाडी कडे 98 जागा मागितल्या आहेत. तर आंबेडकरांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली आहे. त्यामुळे भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यात मतभेद असल्याचं समोर आल आहे. याविषयी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील म्हणाले, आठ जागा लढवणे म्हणजे निवडणूक न लढवण्याचा सारखे आहे. जागावाटपाबाबत ओबीसी आणि प्रकाश आंबेडकर निर्णय घेतील. आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत. जागेसंदर्भात औवेसी निर्णय घेतील. औवेसी यांनी सांगितल्यास आठ जागेवरही लढू असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडीमूळे राज्यात मोठे धक्के बसले आहेत.याचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस-राष्ट्रवादीला बसला आहे. यात वंचित बहुजन आघाडीने 31 लाखाहून अधिक मत घेतले आहेत. यात शिवसेनचा बाल्ले किल्ला असेलेल्या औरंगाबादेत एमआयएमचा खासदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर निवडुन आला आहे. यासह अनेक ठिकाणी दुसऱ्या व तिसऱ्या ठिकाणी उमेदवार राहिले.
- निवडणुकीच्या तोंडावर मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य सरकारला धरणार धारेवर
- कॉंग्रेस नेत्यांच्या जाण्याने कार्यकर्ते खुश, साखर वाटून करणार आनंदोत्सव
- जागावाटपावरून वंचित आघाडीत मिठाचा खडा ? एमआयएम आणि भारिपमध्ये मतभेद
- आजवर चांगुलपणा बघितला, आता आक्रमकपणा बघा, हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादीला खुल आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
