Share

कॉंग्रेस नेत्यांच्या जाण्याने कार्यकर्ते खुश, साखर वाटून करणार आनंदोत्सव

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे अनेक जुने आणि निष्ठावान नेते पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी भाजप – सेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस पक्षात कमालीची मरगळ आली असल्याची चर्चा आहे. मात्र पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत विरुद्ध प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पक्ष सोडून जाऊ लागल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनी या साखर वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाबाबत ते म्हणाले की, या नेत्यांच्या जाण्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्याचा आनंद साखर वाटून व्यक्त करण्यासाठी अभिनव चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येत्या शुक्रवारी सकाळी साडेदहाला हा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच काही नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीच अनेक जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता पर्यंत कॉंग्रेसचे कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, माणिकराव गावीत, निर्मला गावीत इ. नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तर हर्षवर्धन पाटील हे ही भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!