Share

Assembly Session 2022 | छत्रपतींच्या विचारांना छेद देण्याचे काम शिंदे सरकारने केले ; अंबादास दानवेंचा प्रहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात रोज नव नवीन घडामोडी सुद्धा घडत आहेत. पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. या पूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवना बाहेरविरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणा देत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यावेळी सुद्धा अंबादास दानवे यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत पुन्हा एकदा विरोधकांवर हल्ला बोल केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी टीका केली.

स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवता आणि शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायला परवानगी देत नसल्याची टीका आता शिंदे-फडणवीस सरकारवरविरोधी पक्षाकडून केली जात आहे. अशातच आता शिंदे गटाचे कट्टर विरोधक अशी ओळख असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला. ‘शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, अशा घटनेचा विषय जर हे सरकार विसरत असेल तर मग हे कुठलं हिंदुत्वाचं सरकार, अशी टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. शिवसेनेचे राज्यातील काही महत्वाचे आमदार सुद्धा त्यांच्या सोबत शिंदे गटात गेले. त्यामुळे शिवसेना मात्र खिंडार पडले. काही आमदार गेले म्हणून शिवसेना गेलेली नाही. शिवसेना आणि शिवसैनिक जागेवर आहे. त्याचबरोबर जनतेचा पाठिंबा सुद्धा शिवसेनेच्या मागे पूर्वीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शिवसेनाच सर्वांच्या नाका-तोंडात पाणी घालेल” असा खोचक टोला सुद्धा दानवे यांनी विरोधकांना लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!