🕒 1 min read
मुंबई : आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत यांचीही उपस्थिती आहे. यावेळी शिवसेनेने पाच महत्वाचे ठराव मंजूर केले असून त्यापैकी शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही असा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडेंनी सवाल उपस्थित केला आहे.
“जेंव्हा महापौर बंगल्यात मा. बाळासाहेबांचं स्मारक करायचं होतं तेंव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता म्हणता फक्त तुमचेच अस कस????”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे केला आहे.
जेंव्हा महापौर बंगल्यात मा. बाळासाहेबांचं स्मारक करायचं होतं तेंव्हा बाळासाहेब पूर्ण हिंदुस्थानचे होते. आता म्हणता फक्त तुमचेच अस कस????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 25, 2022
शिवसेनेचे पाच ठराव-
बंडखोरांना त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, मी मध्ये पडणार नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या बैठकीत पाच ठराव मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
