🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) महिला आघाडीच्या तोफ समजले जाणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद (Dipali Sayyad) या आपल्या सडेतोड वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. दीपाली सय्यद सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. शिवसेनेच्या विरोधकांना नेहमी लक्ष्य करत असतात. शिवसेनेच्या वतीने आपली भूमिका मांडत असतात. आता दीपाली सय्यद यांनी मोदी सरकारच्या अग्निपथ या योजनेवर भाष्य केले आहे. ट्विट करत त्यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.
दीपाली सय्यद यांनी ट्विट करत मोदी सरकार व भाजपवर वार केला आहे. दीपाली सय्यद आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “२०२४ निवडणुकी आगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भिती भाजपाला आहे.अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणुक महत्वाची हे मोदीजींचे धोरण चुकीचे आहे.”
२०२४ निवडणुकी आगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे नाहीतर याचे पडसाद निवडणुकीला दिसतील याची भिती भाजपाला आहे.अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या हेतुने विरोध जरी झाले, नुकसान झाले तरी निवडणुक महत्वाची हे मोदीजींचे धोरण चुकीचे आहे.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 18, 2022
दीपाली सय्यद नेहमी राज्याच्या आणि राजय अंतर्गत विषयांवर भाष्य करत असतात. यावेळी मात्र त्यांनी केंद्राच्या अग्निपथ योजनेवर, मोदी सरकारवर थेटपणे टीका केली आहे. दीपाली सय्यद यांचे ट्विट आता चर्चेत आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
