🕒 1 min read
मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात तुफान खडाजंगी पाहायला मिळाली आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनात विरोधी आणि सत्त्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पहायला मिळाली. अनेक मुद्द्यांवर वाद झाले आहेत. त्यात विधानसभेचा अध्यक्ष निवडण्याचा नियम बदल करण्याचा मुद्दाही होता. यावर विरोधीपक्ष भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे.
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत नियम समितीने एक शिफारस केली आहे. ज्या प्रमाणे आपल्या देशात खुल्या मतदान पद्धतीने सर्व विषय हताळले जातात. अध्यक्षाची निवड व्हावी. यासाठी शिफारस सभागृहाकडे दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर बोलताना ठाकरे सरकारला टोमणा मारला आहे.
ज्या सरकारकडे 170 चे बहुमत सांगितले जाते, त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमतावर विश्वास का नाही? महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही. ठाकरे सरकारचा स्वतःच्या आमदारांवरच अविश्वास असणारे सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच पाहिले नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी प्रथा होती, ती बदलण्याचा अट्टहास का? तुम्ही हे रेटून नेणार असाल तर आम्ही आमची लढाई कायदेशीर लढू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- त्यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो; सुधीर मुनगंटीवार संतापले
- गेवराईतील वाळू प्रकरण विधानसभेत गाजले; महसूलमंत्र्यांकडून भरारी पथकांची स्थापना..!
- अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; पेडणेकरांचा चंद्रकांत पाटलांना सवाल
- मोदींची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना तात्काळ निलंबित करा; देवेंद्र फडणवीस आक्रमक
- ‘मविआ’मध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रुपाली पाटील ठोंबरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
